मानेगावात डिजिटल बोर्डचे अनावरण — ‘आम्ही मानेगावकर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मानेगाव (ता.पाटण) येथे मुंबई पोलिस दलातून सेवेत असलेल्या अधिकारी व गावचे सुपुत्र सरपंच जालिंदर माने यांच्या संकल्पनेतून व मुंबई पोलिस दलातून सेवेत असलेल्या अधिकारी पीएसआय कै. दिनकर पिलाजी वाघ यांच्या स्मरणार्थ ‘आम्ही मानेगावकर – माझा गाव, माझा अभिमान, माझी वसुंधरा’ या उपक्रमांतर्गत तलावाच्या बाजूला आकर्षक डिजिटल बोर्ड बसविण्यात आला.
या उपक्रमाचा उद्देश गावाची ओळख अधिक भक्कम करणे, स्वच्छता–पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती वाढविणे आणि गावातील एकात्मता दृढ करणे हा आहे.
अनावरण कार्यक्रमात गावातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डिजिटल बोर्डामुळे गावाच्या प्रमुख प्रवेशद्वाराला आधुनिक स्वरूप मिळाले असून “आम्ही मानेगावकर – आमचा गाव, आमचा अभिमान” हा संदेश उजळून निघत आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे. गावासाठी काहीतरी करावंच — भावना आणि जबाबदारीचं राजकारण मुंबईत कष्ट करून उभं राहिलेल्या प्रत्येक चाकरमानीच्या मनात एकच ध्यास असतो गावासाठी काहीतरी करून दाखवायचं. शहरात मिळालेली प्रगती, अनुभव आणि प्रामाणिक परिश्रमांची जमापुंजी जेव्हा गावासाठी वापरली जाते, तेव्हा ते फक्त काम नसत.
ते आपल्या मातीशी असलेलं नातं, आणि पुढील पिढ्यांना दिलेला संदेश असतो.
आज गावात जे बदल घडत आहेत.
डिजिटल बोर्ड असो, सामाजिक उपक्रम असोत, विकासासाठी उचललेली पावलं असोत.
हे सर्व एका विचारातून उगम पावलेलं आहे:
“गाव माझं आहे… आणि त्याच्या विकासाची जबाबदारीही माझीच!”
हीच भावना पुढच्या पिढ्यांना दिशा देते.
राजकारण फक्त पदांमध्ये नसतं.
खरा नेता तोच, जो आपल्या गावासाठी प्रत्यक्ष काम करतो,
स्वतःच्या हाताने, स्वतःच्या कष्टाने बदल घडवतो.
आणि म्हणूनच…
गावासाठी आज केलेली प्रत्येक छोटी कृती,
उद्याच्या मोठ्या विकासाची बीजं रुजवत असते.
हीच ओळख, हीच परंपरा, आणि हाच खरा अभिमान!
Comments
Post a Comment