शासन व शेतकऱ्यांमधील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी हा दुवा : अँड.प्रकाश पाटील

 


राज्यात शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची संख्या खूप व असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा उर्वरित शेतकऱ्यांना करून देण्याची आज गरज आहे. त्यामुळे संघाने वेळोवेळी शासनाकडे मागणी केलेल्या आणि रास्त असलेल्या मागण्या मान्य झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाला काम करताना पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा मध्यस्थ म्हणून उपयोग करून घेता येईल.असे शासकिय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ऍड प्रकाश पाटील यांनी राहुरी विद्यापीठाजवलील हिंदुस्थान ऍग्रो च्या प्रांगणात संघाच्या एक दिवसीय अधिवेशनात बोलताना मांडले.कार्यक्रमासाठी मा एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहणार होते.परंतु त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झालेमुळे त्यांचा दौरा रद्द झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते.  शासनाच्या विविध समित्या, शासकीय धोरण व

त्या संबंधित समित्या वर राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकाऱ्यांना प्राधान्याने प्रतिनिधित्व देण्याची आज गरज असून हेच पुरस्कार प्राप्त शेतकरी शासनाचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवू शकतील, त्यासाठी त्यांच्या मान्य करण्याची मागणी अधिवेशनात करण्यात आली.यासोबतच शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेत मजुरी रोजगार हमी योजने तुन देणे, शेतकऱ्यांना चोवीस तास विज देणे,शेतमाल प्रक्रियेस चालना देणे,कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्य पद देणे ह्या मागण्या करण्यात आल्या.प्रातिनिधिक स्वरुपात शेतकऱ्यांचा सहपत्नीक शाल व पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.सर्व पुरस्कार प्राप्त शेतकरी जोडप्यांना शाल व पैठणी सन्मानाने देण्यात आली. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व द्वीप प्रज्वलन करण्यात आले. शासकिय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष कृषिभूषण नाथराव कराड यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमास संघाचे, उपाध्यक्ष सदाशिव थोरात(परभणी),उपाध्यक्ष प्रल्हाद वरे(बारामती), कृषी क्षेत्रातील कृषीरत्न कांतराव देशमुख(परभणी) , कृषीरत्न शेखर भरसावडे,कृषी रत्न बाळासाहेब पिसोरे, धुळे जिल्ह्यातुन जिल्हा अध्यक्ष कृषिभूषण दिलीप पाटील, कृषिभूषण वाल्मिक पाटील, कृषिभूषन प्रभाकर चौधरी, डॉ नरेंद्र भदाने,शिवाजी राजपुत,विलास माळी,सुदाम करंके, महेंद्र परदेशी, वसंत साळुंखे, भिमराव बोरसे,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातुन आलेल्या सुमारे दोन हजार पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सहपत्नीक आले होते. शकल्याने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशनाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न