वाईच्या गोरे दांपत्याचे पाणीदार गावांसाठी सामाजिक बांधिलकी जपत श्रमदान
खरंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेण्यात लोक मग्न असतात आणि गोरे दाम्पत्य इकडे श्रमदानातून पाणीदार गाव करण्यासाठी आपले योगदान देतात ही या दांपत्याची आगळीवेगळी सामाजिक बांधिलकीची जाणीवच म्हणावी लागेल.
गोरे दांपत्याने भिलारवाडी पाणीदार गाव मोहिमेची माहिती घेऊन सकाळी सर्वांबरोबर श्रमदानासाठी उपस्थित राहिले तेही श्रमदान करणाऱ्या सर्व लोकांसाठी फलाहार घेऊन आणि सोबत गाव पाणीदार करण्यासाठी आपल्या परीने जे योगदान देता येईल ते देण्याच्या निश्चयाने.
गोरे दाम्पत्याने श्रमदान संपल्यावर यापुढेही या चळवळीत सहभागी होण्याचा व जेव्हा जेव्हा सामाजिक काम असेल तेव्हा खारीचा वाटा उचलण्याचा मानस व्यक्त केला.सामाजिक बांधिलकीने भिलारवाडीकर ग्रामस्थही भारावून गेले.उपसरपंच सौ.उषाताई पवार व सदस्य दिपक पवार यांनी गोरे दांपत्य हे खरेखुरे समाजशिक्षक असल्याची भावना व्यक्त केली.

Comments
Post a Comment