महाआवास अभियानात पाटण तालुक्यातील जिंती ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक
तळमावले/वार्ताहर राज्य शासनाने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात पाटण तालुक्यातील जिंती ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जिंती ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर जिंतीच्या ग्रामस्थांनी पावनगड निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करून सत्कार केला. केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना यांचा लाभ महाआवास अभियानाद्वारे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवला जात आहे. पाटण तालुक्यातील शिवसेनेची सत्ता असलेल्या जिंती ग्रामपंचायतीने महाआवास अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, याचा आनंद आहे. जिंती ग्रामपंचायतीने 2021-22 मध्ये 116 लाभार्थींना या अभियानाचा लाभ ...