Posts

Showing posts from May, 2025

" कुछ भी नही रहता दुनिया मे, लोगो रह जाती है दोस्ती i जिंदगी का नाम दोस्ती दोस्ती का नाम जिंदगी "

Image
डॉ.नितीन बेलागडे /ढेबेवाडी                      प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटे येतात अडचणीही येतात त्यावेळी त्याला गरज असते ती आधाराची  आणि तो आधार देण्याचे काम खऱ्या अर्थाने मित्र करत असतो.                "कुछ भी नही रहता दुनिया मे, लोगो रह जाती है दोस्ती" आणि म्हणून मित्रांचे स्थान आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असते.  स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपण सर्व शाळेतील मित्र एकत्र आलो आहोत संकटाच्या काळात आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. कुठलाही भेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका प्रमुखांनी जपली पाहिजे. अशी भूमिका प्रसाद जानुगडे यांनी स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावरुन मांडली.                30 वर्षांपूर्वी  १९९६ इयत्ता दहावी शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते ढेबेवाडी येथील कर...

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मुंबई विभाग युवक अध्यक्षपदी संतोष कदम यांची नियुक्ती

Image
तळमावले/वार्ताहर छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मुंबई विभाग युवक अध्यक्षपदी संतोष कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे मुंबई, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम, सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती करण्यात आली.

संविधान उद्देशिका भेट देऊन नव दांम्पत्याला शुभेच्छा

Image
तळमावले/वार्ताहर                पाटण तालुक्यातील चाळकेवाडी (कुंभारगांव) येथे सौ.सविता आणि आप्पासोा निवडूंगे यांची कन्या अक्षता आणि सुनील सावंत यांचे चिरंजीव अक्षय यांचा साखरपुडा शनिवार दि.17 मे, 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या नवदांम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. शुभेच्छा देताना अनेकांनी अक्षता आणि अक्षय यांना भेटवस्तू म्हणून फ्रेम, बुके दिले.               मात्र यामध्ये रयत विद्यार्थी विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी आणलेल्या संविधान उदे्दशिकेच्या फ्रेमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, पाटण तालुका बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, माजी उपसभापती रमेश मोरे, माजी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, नानासाहेब सावंत, शिवाजी सुर्वे, प्रा.ए.बी.कणसे, चंद्रकांत चाळके, अशोक माटेकर, डाॅ.दिलीपराव चव्हाण, चंद्रकांत काजारी, प्रवीण निवडूंगे, मारुती निवडूंग...

मोरणा शिक्षण संस्थेची उज्वल निकालांची परंपरा कायम

Image
पाटण :                 माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रु मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे 100% निकाल,न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे 100% निकाल,न्यू इंग्लिश स्कूल, नाटोशी 100% निकाल तसेचहा वत्सलादेवी इंग्लिश मीडियम स्कूल दौलतनगर 100 % निकाल लागला असून विशेष म्हणजे संस्थेच्या सर्व शाखांचे 100%   निकाल लागले असून सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केलेले आहेत,                 सर्व गुणवंत,यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मा.ना.श्री. शंभूराज देसाई साहेब,मंत्री पर्यटन ,खणीकर्म, माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा  व मा. श्री.रविराज देसाई दादा,अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी, मा. श्री. यशराज देसाई दादा,चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर,  मा.ॲड. जयराज देसाई दादा, मा.आदित्यराज देसाई दादा,संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विलास कुराडे ,संस्थेचे...

युवा वर्गाला योग्य दिशा देण्याचे काम धनंजय भाऊ नक्कीच करतील - संतोष कदम

Image
मुंबई/प्रतिनिधी                     सामजिक चळवळीत काम करत असताना चळवळीला व युवकांना योग्य दिशा द्यायची असेल तर अर्थ कारणाची जोड हवीच अशी धनंजय जाधव भाऊ यांची भुमिका होती फक्त बोलून न थांबता धनंजय भाऊंनी सर्व जातीधर्माच्या महामंडळाना एका छताखाली आणत रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करून देण्याचं काम केलं. एकमेव असा नेता आहे जो कार्यक्रमाला आलेल्या नामवंत उद्योजकांना साद घालत आपल्या युवकांना रोजगार स्वयंरोजगार द्या माझ्या सोबत असणाऱ्या माणसाच्या हातात दगड नाही तर रोजगार देण्याचं काम करायचं आहे. अशी प्रामाणिक भूमिका असणारा माणूस व सामजिक जान असणारा बांधिलकी जपणारा व गांभीर्य असणारा नेता . लवकरच युवकांसाठी उद्योगाच्या चाव्या युवकांना देऊन अनेक उद्योजक घडवण्याचे काम नक्कीच करतील असा ठाम विश्वास आहे.  असे मत महाराष्ट्र स्वराज्य पक्ष राज्य कार्यकारीणी सदस्य संतोष कदम यांनी मांडले.