सत्यवान मंडलिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान
कराड/वार्ताहर जग बदल घालूनी घाव| सांगून गेले मला भीमराव||' साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कर्जत तालुका साहित्य प्रेमी मंडळ अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव तालुका कर्जत येथे आयोजित समितीचे अध्यक्ष अभ्यासू, विचार व साहित्याची जाण असणारे तरुण मा श्री तानाजी डाडर, मार्गदर्शक असणारे उपाध्यक्ष मा प्रा श्री देवीदास राऊत आणि त्यांच्या विचारांना साथ करीत नेहमीच सक्रिय असणारे कार्याध्यक्ष मा श्री सुनील गाडे यांनी अपार कष्ट घेऊन आयोजित केलेले थोर साहित्यिक शंकर भाऊ साठे यांच्या स्मृतींना समर्पित करणारे सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ साठे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले. संमेलन सोहळ्याची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. यावेळी सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ढोल ताशा आणि लेझमाच्या तालात परिसर दणाणून सोडला. या भव्यदिव्य सोहळ्यातील उपस्थितांच्या उत्साहाने अण्णाभाऊंनी सांगितलेल्या विचारांची प्रेरणा य...