अक्षय चव्हाण यांच्याकडून सर्वधर्म समभाव संदेश
कराड/वार्ताहर चैत्र वर्ष गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वधर्म समभावाचा संदेश अक्षय चव्हाण यांनी रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. जात, धर्म, वंश, भाषा जरी अनेक असल्या तरी आपण सर्व भारतीय एक आहोत आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे बंधू व भगिनी राहत असतात. त्यातच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अशातच सर्व धर्म समभाव जात, पात न बघता माणुसकी जपूया असा संदेश रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना दिल्या.