तळमावलेत 25 वर्षानंतर पुन्हा भरला दहावीचा वर्ग
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील तळमावले येथील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि उत्तम विद्यार्थी घडवण्याची परंपरा असलेल्या श्री वाल्मिकी विद्यामंदीर मधील 1996-97 साली दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग 25 वर्षानंतर पुन्हा भरला. यानिमित्त 19996-97 रोजीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद, डाॅ.बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे, काकासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमांचे पुजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्री वाल्मिकी विद्यामंदीर मधील विद्यार्थ्यांनी सुमधूर असे स्वागत गीत सादर केले. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांनी सद्या आपण काय करत आहे, कोणत्या पदावर कुठे असतो याची ओळख परेड सर्वांसमोर करुन दिली. पंचवीस वर्षानंतर आपल्या शाळेत एकमेकांना आणि आपल्या शिक्षकांना भेटून सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षिका जुन्या आठवणींना उजाळा देत अगदी रममाण होऊन गेले हो...